‘…मात्र मराठवाडा आपली सासूरवाडी असल्याने ऐकावं लागतं’- अजित पवार

बीड : कोरोनातून सुटका झाली असली तरी प्रत्येकजण मास्कचा अजुनही वापर करताना दिसत आहेत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचादेखील समावेश आहे. अनेक नेत्यांनी काही सभांमध्ये मास्क घातलेला नसला तरी अजित पवारांनी कधीच मास्क काढून भाषण केलं नाही. मात्र, तब्बत दोन वर्षांच्या कालावधीनंतर पवारांनी चक्क मास्क काढत भाषण केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
सध्या अजित पवार बीड दौऱ्यावर असून एका आयोजीत कार्यक्रमात ते बोलण्यासाठी म्हणून उभे राहिले. त्यावेळी उपस्थितांनी अजित पवारांना मास्क काढून बोलण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आपण मास्क काढण्यासाठी कुणाचे ऐकत नाही, मात्र मराठवाडा आपली सासूरवाडी असल्याने ऐकावं लागतं असं म्हणत अखेर अजित पवार यांनी मास्क काढून बोलतो अशी मिश्कील टिपण्णी केली. अजित पवार यांनी तब्बल दोन वर्षांनंतर मास्कशिवाय भाषण केल्याने उपस्थितांना चांगलाचा आश्चर्याचा धक्का बसला असून, सध्या अजित पवार यांच्या मास्कशिवाय भाषणाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे.