AUS Vs SA सामना अनिर्णित! भारताच्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’मध्ये जाण्याच्या आशा पल्लवीत

मुंबई : (World Test Championship 2023) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात होती. यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आधीच गाठली आहे. मात्र, यामुळे भारतीचे अंतिम टेस्ट सामना खेळण्याचे स्वप्न धुसर होताना दिसत आहेत.
आगामी काळात होणारे टेस्ट मालिका ऑस्ट्रेलियाने भारताकडून ०-४ ने गमावली आणि बाकीचे निकालही अपेक्षेप्रमाणे आले तर इतर संघांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पुन्हा पल्लवित होणार आहेत. भारताचे 8 सामने आणि दोन मालिका खेळायचे शिल्लक आहेत, पण भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे समीकरण जरा क्लिष्ट आहे.
गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया ७५.५६ टक्के गुणांसह अव्वल स्थानावर, भारत ५८.९३ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर, श्रीलंका ५३.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आणि दक्षिण आफ्रिका ४८.७२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने ३-१ किंवा ३-० असा विजय मिळवला तर तो कोणावरही अवलंबून न राहता थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तसे न झाल्यास भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान २ कसोटी सामने जिंकावे लागतील. तसेच श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध किमान एक सामना गमावावा किंवा अनिर्णित खेळावा लागेल.
श्रीलंका आणि न्यूझीलंड मालिकेचा निकाल भारताच्या अपेक्षेप्रमाणे लागला नाही किंवा ऑस्ट्रेलियानेही खेळ पालटला आणि भारताने ही मालिका १-२ ने गमावली,जर दक्षिण आफ्रिका वेस्टइंडिज विरुद्धच्या २ कसोटी सामन्यांमधील १कसोटी सामना गमावला किंवा अनिर्णित राहिला तर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकतो. तसेच न्यूझीलंडने कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. असे झाले तरच भारताचा अंतिम फेरीतील मार्ग मोकळा होईल. त्यामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ध्येय गाठण्याचे जितके सोपे आहे तितकेच आवघड आहे.