…म्हणून आज जगभरात होणार बत्ती गुल; पाहा काय आहे ‘अर्थ अवर डे’

Earth Hour : दरवर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी घरातील विद्युत दिवे बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर ‘अर्थ अवर डे’ म्हणून ओळखला जातो. यावेळी, अर्थ आवर डे 25 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोकं रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.
WWF कडून 2007 साली सुरुवात
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने 2007 मध्ये अर्थ अवर डे सुरू केला. अर्थ अवर फाउंडेशनचे सह-संस्थापक अँडी रिडले यांनी WWF च्या सहकार्याने ही मोहीम सुरू केली. 2008 मध्ये अर्थ अवर डेमध्ये 35 देशांनी सहभाग घेतला होता. अर्थात यावेळी संपूर्ण जगात ब्लॅक आऊट होईल. बरेच लोक मेणबत्त्या पेटवून देखील अर्थ अवर साजरा करतात. पर्यावरण तज्ञांच्या मते, WWF च्या या जागतिक मोहिमेची हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर लढायला मदत करेल.
भारतात 2009 पहिल्यांदा अर्थ अवर साजरा
भारत 2009 मध्ये या मोहिमेचा भाग बनला होता. यात 58 शहरांमधील 50 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. 2010 मध्ये भारतातील 128 शहरांतील 70 लाखांहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला होता. यानंतर ही संख्या वाढतच आहे. राजधानी दिल्लीतील वीज वितरण कंपन्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या ग्राहकांना जागरूक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.