ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे : पंतप्रधान मोदी

राजकोट | PM Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजस्थानच्या सीकरमधल्या रॅलीत लाल डायरीचा उल्लेख करत काँग्रेसवर (Congress) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार चालवण्याच्या नावाखाली खोट्या गोष्टी करत आहे. लुटालूट सुरू आहे, त्याचेच ताजे उत्पादन आहे ती म्हणजे राजस्थानची लाल डायरी.

असे म्हणतात की, लाल डायरीत काँग्रेसचे काळे कारनामे लपून बसले आहेत. काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांची बोलती लाल डायरीचे नाव काढल्यावर बंद होते. निवडणुकीत लाल डायरीमुळे काँग्रेसचा डबा गुल होणार असल्याचे मोदी म्हणाले. राजकोट येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले.

राजस्थानमध्ये चांगले रस्ते तयार व्हावेत, राजस्थानचा विकास व्हावा म्हणून केंद्र सरकारने अनेकदा पैसे पाठवले. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा १० वर्षांत १ लाख कोटी रुपये देण्यात आले. आमचे सरकार आल्यानंतर गेल्या ९ वर्षांत भाजपने चार लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला. तरीही विकासकामे रखडली असल्याचे मोदी म्हणाले. लोकशाहीमध्ये जेव्हा आपण सरकार चालवत असतो तेव्हा आपण काय कामे केली त्याचा हिशेब द्यावा लागतो. काँग्रेसकडे आहे का कुठला हिशेब? जे ४ वर्षे झोपा काढत होते ते आता तुम्हाला कुठल्या कामाचा हिशेब देतील का?

राजस्थान सरकारने आपला प्रत्येक दिवस आपसात लढण्यात घालवला आहे. लोकांच्या प्रश्नांशी या सरकारला काही घेणेदेणे नाही, अशीही टीकाही त्यांनी केली. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील १ लक्ष २५ हजार ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले.

आज गरीब घरातला मुलगाही डॉक्टर, इंजिनीअर झाला पाहिजे याची खात्री आम्ही सरकार म्हणून देतो आहोत. गरीब कल्याणासाठी दिल्लीत बसलेला हा प्रधानसेवक तुमच्यासाठी समर्पण भावाने काम करतो आहे.
— नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये