‘हिंदुत्व’ हा भाजपचा आत्मा आहे; चंद्रकांत पाटील

कोल्हापुर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कामगिरीची परीक्षा ठरलेल्या आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा 18, 901 मतांनी विजयी झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचं पालन करताना हिंदूंनी इतरांचा आदर केला पाहिजे. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका भाजपाने मांडलेली नाही. भाजपानं नागरिकांनी दिलेला कौल मान्य केला आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
आम्ही कोल्हापुर पोटनिवडणूक ही विकासावर लढलो आहोत. देशात, राज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. कोल्हापूरसाठी पालकमंत्र्यांनी काय केलं हे सांगावं, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल पहा असा अप्रत्यक्ष रित्या टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.
आज कोल्हापुरात ते बोलत होते. कोल्हापुरआम्ही कोल्हापुर पोटनिवडणूक ही विकासावर लढलो आहे. देशात, राज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. कोल्हापूरसाठी पालकमंत्र्यांनी काय केलं हे सांगावं, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल पहा असा अप्रत्यक्षरित्या टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.