Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“…तर अशी वेळ आलीच नसती”; आदित्य ठाकरेंच्या कारशेड विरोधानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई – AAREY Metro CarShed : मेट्रो कारशेड वरून सध्या राज्यात मोठं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (21 जुलै) कॅबिनेट बैठकीत कारशेड हे आरे मध्येच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर पर्यवरणप्रेमी ‘आरे वाचवा’च्या नाऱ्याखाली आंदोलन करून विरोध दर्शवत आहेत तर राज्यातील विरोधी नेते देखील मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार तयार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड मुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे म्हणून प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्याचबरोबर आरेला पर्याय म्हणून कांजूरमार्ग येथे कारशेड हलवण्यासाठी प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, नवीन सरकारने स्थगिती उठवून लावली आहे. यावरून शिवसेनेचे युवा नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचा निर्णय सुडाच्या राजकारणातून घेण्यात आला असल्याचं म्हटलं आहे अशी टीका केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते. मात्र, त्यांना सगळाच अभ्यास आहे असं नाही. आरे मधील कारशेडसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचा संपूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मिठी नदीला येणारा पूर हा कारशेडमुळे नाही तर आजूबाजूला झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे येत आहे.’ असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. “त्या अनधिकृत बांधकामांना परवानग्या दिल्या नसत्या; तर, आज ही वेळ आली नसती.” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये