
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजही भारतातील बँकांवर व भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवून आहे, ही बाबासाहेबांची देणगी आहे. अशा प्रकारे जागतिक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य ठराविक एका घटकापुरते मर्यादित नव्हते. राष्ट्रउभारणीमध्येही बाबासाहेबांचे कार्य मोलाचे होते. वंचित घटकांना दिलेला न्याय, राज्यघटनेचे शिल्पकार, कामगारांचे प्रश्न सोडवणारा नेता, शिक्षणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, कृषितज्ज्ञ इत्यादी अनेक कार्यांसंबंधी बाबासाहेबांची ख्याती आहे. जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. म्हणून आपण बाबासाहेबांनी केलेल्या अर्थविषयक कार्याचा आढावा घेऊ.
बाबासाहेब कामगारविषयक धोरण ठरवत असताना भारतामध्ये कामगारांना १४ तास काम करावे लागत असे, तसेच भारतामध्ये कामगारांना पेन्शन मिळत नसे. कामगार, मजूर, कर्मचारी आनंदी राहण्यासाठी बाबासाहेबांनी कामाचे तास १४ तासांवरून आठ तास केले. कामगार आणि कर्मचारी यांना आठ तासांपेक्षा जास्त काळ काम देता कामा नये, असा कायदा केला. भारतामध्ये हे कामगार, मजूर, कर्मचारी यांना पेन्शन दिली जात नव्हती. त्यांना पेन्शन कायदा लागू केला. भारतामध्ये दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात पडत असे. पारंपरिक शेती केली जात. शेतकरी सतत अडचणीत असे. १९४५ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना श्रम, विद्युत, जल हे खाते भारत सरकारने बाबासाहेबांकडे सोपवले होते. दामोदर प्रकल्प केल्यामुळे त्या परिसरातील जमिनी सुपीक झाल्या. त्याशिवाय विद्युतनिर्मिती, नौकानयन, इरिगेशन, रोजगारनिर्मिती या उद्योगधंद्यांना पाणी, वीज देऊन शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला, तसेच भारत सरकारलाही आर्थिक उत्पादनाची साधने निर्माण केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी लंडन विद्यापीठात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक या संस्थेत प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्यांनी डॉ. प्रा. केनान यांच्या मार्गदर्शनाखाली रुपयापुढील समस्या या विषयावर प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. प्रबंध पूर्ण झाल्यानंतर केन्स व बाबासाहेबांमध्ये काही मुद्द्यांवर तात्त्विक मतभेद झाले. बाबासाहेबांनी केन्स यांची मते पुराव्यानिशी खोडून काढत त्यांना सांगितले, की भारतीय रुपया हा सक्षम होता. ब्रिटिशांच्या भारत विरोधी धोरणामुळे रुपया अडचणीत आला आहे, तसेच बाबासाहेबांनी भारताच्या आयात-निर्यात धोरणासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली. इंग्रज भारतामधून कच्चा माल स्वस्तामध्ये घेऊन जातात. उदाहरणार्थ मसाल्याचे पदार्थ कापूस इत्यादी व पक्का माल जास्त पैशाला विकतात. याला बाबासाहेबांनी ब्रिटनकडून भारतीयांची होणारी लूटमार असे म्हटले आहे. कॅनन व केन्स यांच्यासह अनेक ब्रिटिश अर्थतज्ज्ञांचे मत असे होते, की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयांची किंमत स्वतःहून स्थिर होईल, परंतु या तारखांच्याविरोधात बाबासाहेबांनी अनेक पुरावे दिले. अनेक आकडेवारी सादर केल्या. केन्स यांचे मत खोडून काढले.
बाबासाहेबांच्या मते ते जोपर्यंत रुपयाची क्रयशक्ती स्थिर होत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत स्थिर होत नाही, यावरून केन्स आणि बाबासाहेब यांच्यामध्ये तात्त्विक मतभेद निर्माण झाले. बाबासाहेबांनी भारतामधील अर्थव्यवस्थेसंबंधी इंग्रजांनी जी फाऊलर समिती नेमली होती ती त्या फाऊलर समितीच्या शिफारशींनाही विरोध केला. बाबासाहेब म्हणाले, भारतातील अर्थव्यवस्थेत जो काही गोंधळ उडाला आहे तो फाऊलर कमिटीच्या शिफारशीमुळे गोंधळ उडाला आहे. बाबासाहेब या कमिटीला वेडपट, बावळट असे म्हणतात. बाबासाहेबांनी इंग्रजांच्या अर्थनीतीवर जोरकस टीका केली. त्यामुळे इंग्रजी अर्थतज्ज्ञांनी व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक या संस्थेने, तसेच लंडन विद्यापीठाने बाबासाहेबांना डी. एस्सी. ही पदवी देण्यास टाळाटाळ सुरू झाली. इंग्रजी अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांना त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधामध्ये इंग्रजांच्याविरोधात जी मते मांडली आहेत, ती बदलण्यासंबंधी व इंग्रजांसंबंधी जी भाषा वापरली आहे, ती बदलण्यासंबंधित अप्रत्यक्षपणे सुचवले जाऊ लागले, परंतु बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले, की मी माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल, असे लिहिणार नाही व माझी मते मांडली आहेत, ती अभ्यासपूर्ण मांडली आहेेत.
इंग्रजी अर्थतज्ज्ञाने घेतलेल्या प्रत्येक हरकतीचे पुराव्यासहित खंडन केले आहे. त्यामुळे या प्रबंधामध्ये सुचवलेली व घेतलेली भूमिका यामध्ये कसलाही बदल करणार नाही. भले मला पदवी मिळाली नााही तरी चालेल, इंग्रज अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ नरमले. बाबासाहेबांनी इंग्रजांबद्दल जे शब्द वापरले होते ते शेलके शब्द काही प्रमाणात काढून टाकले आणि इंग्रज सरकारने बाबासाहेबांसमोर नमते घेऊन त्यांना विद्यापीठाची पदवी बहाल केली. या प्रबंधामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे आणि भविष्यकाळात भारतीय इंग्रज व जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित जी मते मांडली. त्यामुळे बाबासाहेब जागतिक अर्थतज्ज्ञ म्हणून नावलौकिक पावले अशा प्रकारे बाबासाहेब आपल्या राष्ट्रप्रेमापुढे कोणत्याही बाबीची परवा करीत नसत. बाबासाहेबांनी जो प्रबंध लिहिला, त्याचेच रूपांतर पुढे प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकात झाले.
या पुस्तकामध्ये प्रस्तावना लिहिताना त्यांचे गुरू प्रा. डॉ. केनान म्हणतात, डॉ. आंबेडकरांच्या काही मुद्यांशी मी सहमत नाही, पण डॉ. आंबेडकरांनी मूळ मुद्द्याला हात घालून वर्मावर बोट ठेवले व त्यांनी त्यांचे मुद्दे ते बरोबर कसे आहेत, हे पटवून दिले. हे पटवून देत असताना आंबेडकरांनी अनेक उदाहरणे दिली. त्यामध्ये मोगल काळातल्या रुपयाचेही उदाहरण दिले. तसेच रुपया आणि पौंड यामुळे भारतीयांचे कसे नुकसान झाले आहे,
हेही दाखवून देऊन इंग्रज अर्थतज्ज्ञांची व अर्थतज्ज्ञ केन्स यांचे तोंड बंद केले. बाबासाहेबांनी १ मण मिठावर इंग्रज सरकारने दोन रुपयांवरून अडीच रुपयांपर्यंत कर वाढविला होता. त्यावर कडाडून टीका केली. बाबासाहेबांनी सेन्ट्रल बँकेची मांडलेली कल्पना इंग्रजांनी मान्य केली. १९३५ मध्ये सेंट्रल बँकेचे रूपांतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये
करण्यात आले.
प्रा. कृष्णा ताटे