ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

पुढील काळात कोणतेही पक्ष एकत्र येवू शकतात; पवारांच्या भेटीनंतर,शिंदे गटाचा भाजपला इशारा?

मुंबई : (Gulabrao Patil On Devendra Fadnavis) सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण खूप वेगळं झालं मार्गावर येवून टेकलं आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातील नेते फुटून दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील याचा काही नेम उरला नाही. शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटाने भाजपच्या मदतीनं नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळं शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने पूर्वीच्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाने नवीन पक्षाचं नाव चिन्ह स्थापन केलं आहे.

दरम्यान, शुक्रवार दि. 4 रोजी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्रीच कॅंडी रुग्णालयात जावून भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं आहे. त्यात ते म्हणाले, भविष्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात. आता पाटील यांनी एकत्र येण्याबाबत सुचक वक्तव्य करून भाजपला इशारा दिलाय का? अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत.

शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार का? असा सवाल केला असता, त्यावर पाटील म्हणाले की, भविष्यात कोणताही गट एकत्र येऊ शकतो. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पवार भेटीनंतर शिंदे गट आणि राष्ट्रवादीची भविष्यात युती होऊ शकते, असं विधान केलं होतं. त्यामुळं राज्याच्या राजकारणात कधी काय होईल? याचे आंदाज लावणे आता राजकीय विश्लेषकांना देखील जमणार हे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये