क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

मुंबईकरांची कांगारूंशी कडवी झुंज! राहाणेंची शतकाकडे तर शार्दुलची अर्धशतकाकडे कुच..

लंडन : (Ind Vs Aus WTC 2023 Final Match) भारताने तिसऱ्या दिवशी आपला पहिला डाव 5 बाद 151 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मात्र सुरूवातीलाच श्रीकार भरत 5 धावांवर बोलँडची शिकार झाला. यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने अजिंक्य रहाणेला साथ देण्यास सुरूवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी भागादारी रचत संघाला 200 धावांच्या पार पोहचवले. दरम्यान, मुंबईकर अजिंक्य रहाणेने आपले अर्धशतक पूर्ण करत तब्बल 18 महिन्यांनी केलेले आपले पुनरागमन यशस्वी करून दाखवले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होईल. सुरुवातीच्या दोन दिवसांत विरोधी संघाने ब्लू संघावर वर्चस्व गाजवले. टीम इंडियाला विजेतेपदाची लढाई जिंकायची असेल, तर रहाणे आणि शार्दुलच्या जोडीला अप्रतिम कामगिरी करावी लागेल.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. अजिक्या राहाणे 89 धावांवर तर शार्दुल ठाकुर 36 धावांवर नाबाद खेळत आहेत. या जोडीची दोहेरी शतकी भागीदारी होणे अपेक्षित आहे. तेव्हाच कुठे क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये