क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

नांदेड दुर्घटनेनं देश हादरला! आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, शिंदे-फडणवीसांकडून 24 निष्पाप जीवाची हत्या..

नांदेड : (Prakash Ambedkar On Shinde-Fadnavis) नांदेड जिल्हा (Nanded) शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती आता रुग्णालयात चौकशी करणार आहे. चौकशी समिती येणार आहे म्हणून आता शासकीय रुग्णालय प्रशासन अलर्टवर आहे. ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून (Sharad Pawar) ते काँग्रेस नेते राहुल गांधीनी (Rahul Gandhi) सरकारवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 24 निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 24 निष्पाप अमूल्य जीवाची हत्या केली. 24 जिवामध्ये 12 नवजात बाळाचा समावेश आहे हे ऐकून मी आणि माझी पत्नी निशब्द झालो आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले, वेळेवर औषध पुरवठा न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला. हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळेच राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. मुंबईत देखील अनेक सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमधे औषधांची हीच परिस्थिती आहे. त्याचे परिणाम राज्यभरातल्या निष्पाप जनतेला भोगावे लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये