ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मी राजवाडा सोडून बाहेर पडलोय, मंत्र्यांचे मला माहित नाहीय; संभाजीराजेंचं खोचक उत्तर

बीड : (Sambhajiraje Chhatrapati on State Government) छत्रपती शिवाजी महाराज घराण्याचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहाणी केली आहे. आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात थैमान घातलं असून सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.

मात्र, राज्य सरकारमधील मंत्र्यांनी नुकसानीची पाहाणी करण्यासाठी यावं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. मी मात्र राजवाडा सोडून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर आलोय, अशा भावना व्यक्त करत यावेळी संभाजीराजेंनी मंत्र्यांवर टिपण्णी केली.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. आठवड्यापासून सतत होणाऱ्या पावसाने उभ्या पिकांचा सुपडा साफ केला असताना मंत्र्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. एनडीआरएफ आणि एसआरएफच्या विशेष बाबीमधून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करा, अशी मागणी संभाजीराजेंनी सरकारकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये