“ही बाळासाहेबांची शिवसेना; आम्हाला कोणीही आडवू शकत नाही” शिंदे आक्रमक!

गुवाहाटी/मुंबई : (Eknath Shinde On Shivsena) सोमवार दि. २० रोजी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. बंडखोर शिंदे गट आणी शिवसेनेच्या वादात ‘वेट अॅंन्ड वाॅच’ च्या भुमिकेत असलेल्या भाजपनं आता यात उडू घेतली असून, ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायाला लावणारं पत्र राज्यपालांना दिलं आहे. त्यावर एका दिवसात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ठाकरे सरकाराला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीतील सर्व बंडखोरांना मुंबईत यावे लागणार आहे.
दरम्यान, या विरोधात शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी पार पडणार आहे. बंडखोरी करून गुवाहाटी येथे आठवडाभरापासून मुक्काम ठोकलेल्या सर्व आमदारांनी आज माँ कामाख्या देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. सर्व आमदारांनी अगदी मोकळेपणानं दर्शन घेतले. त्यामुळे कोणत्याही आमदाराला येथे बळजबरी आणले गेले नसल्याचा पुनुरुच्चार एकनाथ शिंदेयांनी केला आहे.
शिंदे म्हणाले, आम्हाला कोणी रोखू शकत नाही. उद्या सकाळी सर्व आमदार मुंबईत पोहोचतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते कामाख्या देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. लोकशाहीत क्रमांक आणि बहुमताला महत्व असते. या देशात संविधान, कायदा आणि नियमाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जी काही प्रक्रिया होईल त्यामध्ये आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ असा विश्वासही यावळी शिंदे यांनी व्यक्त केला. आठ दिवसापासून शांत असणारे शिंदे यावेळ आक्रमक झालेले पहायला मिळाले.