क्राईमदेश - विदेशरणधुमाळी

नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयानं टी.व्ही’वर संपूर्ण देशाची माफी मागायला लावली!

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमी चर्चेत असणाऱ्या नुपुर शर्माच्या एका वक्तव्यांनं देशात वादंग निर्माण केलं होतं. दोन दिवसांपुर्वी नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उदयपुरमध्ये उमटत हत्याकांडासारखी मोठी घटना घडली.

दरम्यान, शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं आहे. त्यानंतर ‘द काश्मिर फाईल्स’चे दिग्दर्शक विवैक अग्निहोत्री यांनी त्यावर केलेलं ट्वीट चर्चेत आलं. अग्निहोत्री यांनी त्या ट्वीटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे हे मात्र अचूक समजत आहे. त्यामुळं सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे प्रकरण एवढ्याच न थांबता गीतकार मनोज मुंतशीर यांनी देखील यासंदर्भात सोशल मीडियावर लिहिलं आहे. पैगंबर मोहम्म्द यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना चांगलंचं फटकारलं आहे. तसंच,नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उदयपुरमध्ये उमटले अन् हत्याकांडासारखी मोठी घटना घडली म्हणत त्यांना देशाची माफी मागायला सांगितली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये