ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“रामदास कदम चिल्लर माणूस, सरड्यापेक्षा जास्त…”; शिवसेनेची घणाघाती टीका!

मुंबई : (Sushma Andhare On Ramdas Kadam) शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. अन्यवेळी मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्यांकडून कदमांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा कदमांचा भरघोस समाचार घेतला.

दरम्यान सुषमा आंधारे म्हणाल्या, “बुधवारपासून रामदास कदमांच्या विरोधात राज्यात शिवसेना आंदोलन करणार आहे. कदम यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं. ज्या मराठवाड्यात कदम यांनी संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. तेथील लातूर, बीड जिल्ह्यात येऊन दाखवावे,” असे आव्हान सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत कदमांना दिलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, रामदास कदमांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अथवा रश्मी ठाकरे बोलत नाहीत. परंतु, शिवसेनेतील कोणाही तुमच्या नितीवर, ध्येयधोरणावर, कामाच्या पद्धतीवर बोलेल. पण, कुटुंबावर किंवा वैयक्तिक गोष्टींवर कोणी बोलणार नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता. सरड्यापेक्षा वेगात रंग बदलता तुम्ही. कदमांकडे एवढी ताकद आणि निष्ठेची भाषा कोठून आली. कुठे या चिल्लर चिल्लर माणसांकडे लक्ष द्यायचे,” असा टोलाही सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये