“56 वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधण्याचं काम राऊतांनी केलं”

पुणे -Vijay Shivtare on Sanjay Raut | राज्यात सत्तासंघर्षामध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शिवसेनेचे जवळपास 39 आमदारांनी बंडखोरी केली आहे. या सर्व परिस्थितीला संजय राऊत जबाबदार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचा मी माजी मंत्री आणि नेता म्हणून आज बोलणार आहे तसं पत्र काढलं आहे. भाजपसोबत सरकार बनवा, दुसरा पर्याय नाही आणि त्याशिवाय भविष्य नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान, 56 वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधण्याचं काम संजय राऊतांनी केली आहे. महाविकास आघाडीमधून बाहेर पडून हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या आपला मित्र पक्ष भाजपसोबत जावं, असंही शिवतारे म्हणाले.