‘या’ तारखेपासून ‘प्लास्टिक स्ट्रॅा’ वापरावर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | Ban On Use Of Plastic Straw – पॅक्ड ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसह मिळणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॅावर केंद्र सरकार १ जुलैपासून बंदी घालणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या दुग्ध समूह अमूलने सरकारला पत्र लिहिले आहे. अमूलने सरकारला प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. तसंच सरकारच्या या निर्णयाचा परिणाम दूध उत्पादक शेतकरी आणि यासंबंधित उत्पादनांच्या विक्रीवर होणार असल्याचं अमूल कंपनीने म्हटलं आहे.

केंद्र सरकारला अमूल कंपनीच्या आधी अनेक शीतपेय विक्रेत्या कंपन्यांनी प्लॅस्टिक स्ट्रॉवर बंदी घालू नये, अशी विनंती केली होती. मात्र सरकारने ही विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अमूल कंपनीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलं आहे. पीएमओला लिहिलेल्या पत्रात अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी म्हणाले की, प्लास्टिकच्या स्ट्रॉमुळे दुधाची विक्री वाढण्यास मदत होते.

अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी म्हणाले, स्टिक स्ट्रॉवरील बंदीचा निर्णय काही दिवसांसाठी वाढवल्यास देशातील 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. बातमीनुसार, प्लास्टिक स्ट्रॉ हे कमी वापरले जाणारे उत्पादन आहे. जे पेपर स्ट्रॉने बदलले जाऊ शकते. 5 ते 30 रुपये किंमतीच्या ज्यूस आणि दुधाच्या उत्पादनांचा भारतात मोठा व्यवसाय आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोला यांची बहुतांश शीतपेये प्लास्टिक स्ट्रॉसह पॅक करून ग्राहकांना दिली जातात.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे अमूल, पेप्सिको आणि कोका-कोलासह अनेक शीतपेय कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. मात्र सरकारने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आहे आणि कंपन्यांना पर्यायी स्ट्रॉचा वापर करण्यास सांगितलं आहे. पीएमओला लिहिलेल्या पत्रात या कंपन्यांनी प्लास्टिक स्ट्रॉचा पर्याय स्वीकारण्यासाठी सरकारकडे आणखी वेळ मागितला आहे.

Sumitra nalawade: