इस्रायलचा गाझा पट्टीवर पुन्‍हा भीषण हल्ला, ३० पॅलेस्टिनी ठार

इस्रायलचा गाझा पट्टीवर पुन्‍हा भीषण हल्ला

इस्रायल-हमास युद्ध दिवसेंदिवस अधिक रक्‍तरंजित होत चालेले आहे. यामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांना लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसवर झालेल्‍या हवाई हल्‍ल्‍यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार आणि ५० जखमी झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.१३) एन्क्लेव्हमधील मृतांची संख्या ६६ झाली असल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.

गाझा पोस्ट ऑफिसवर हल्ला

इस्‍त्रायल पॅलेस्‍टिन संघर्ष मागील १४ महिन्‍यांपासून सुरु आहे. नुसेरात कॅम्पमधील पोस्ट ऑफिसवर गुरुवारी हवाई हल्‍ला करण्‍यात आला. येथे विस्थापित कुटुंबांनी आश्रय घेतला होता. इस्‍त्रायलच्‍या हल्‍ल्‍यात पोस्‍ट परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले, असे डॉक्टरांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. या हल्‍ल्‍यात इस्त्रायली हल्ल्यात किमान 30 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मध्य गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसमध्ये आश्रय घेणारे ५० जखमी झाले आहे. ज्यामुळे गुरुवारी एन्क्लेव्हमधील मृतांची संख्या 66 वर पोहोचली आहे. इस्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की, मारलेले गेलेले हमासचे दहशतवादी होते. जहाज अपहरण करण्याचा प्रयत्नावेळी केलेल्‍या कारवाईत ते मारले गेले आहेत.

हमासने सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यापासून गाझामध्ये मदत ट्रक सुरक्षित करण्याचे काम करणाऱ्या इस्त्रायली लष्करी हल्ल्यात किमान ७०० पोलिस ठार झाले आहेत. इस्रायली सैन्याने गुरुवारी गाझा शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक जिल्ह्यांतील रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिले होते. ही हल्ल्यापूर्वी पूर्व चेतावणी आहे,” असे पोस्ट इस्‍त्रायलच्‍या लष्कराने केली होती. गाझा शहरातील अल-जला स्ट्रीटमधील निवासी इमारतीवर आणि नुसीरतच्या पश्चिमेकडील घरावर इस्रायली बॉम्बहल्ल्यात २२लोक ठार झाले, असे डॉक्टर आणि पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA यांनी सांगितले.

अमेरिकेच्‍या पाठिंब्याने इजिप्त आणि कतार यांनी अनेक महिन्यांपासून युद्धविरामाच्या प्रयत्‍न सुरु ठेवला आहे. बुधवार, १२ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने तात्काळ, बिनशर्त आणि कायमस्वरूपी युद्धविराम इस्रायलमध्ये जप्त केलेल्या आणि गाझामध्ये हमासने ताब्यात घेतलेल्या सर्व ओलीसांची तात्काळ सुटका करण्याच्या मागणीसाठी मतदान झाले. दरम्‍यान, इस्‍त्रायल-पॅलेस्‍टिनी संघर्षात आतापर्यंत तब्‍बल ४४ हजार ८०० जण ठार झाले आहेत.

Rashtra Sanchar: