‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडताना केलेली दादागिरी भोवली, जितेंद्र आव्हाडांवर अटकेची कारवाई

मुंबई | Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना माॅलमध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. त्या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाचं विकृतीकरण झालं आहे. शिवाजी महाराजांची बदनामी झाली आहे. या बदनामीला विरोध करत असल्यानं अटकेची कारवाई होत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे. सरकार मला शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास सांगण्यापासून रोखत आहे. हे सरकार कोणाचं आहे हे स्पष्ट होत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच आव्हाड यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर राडा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. वर्तकनगर पोलिसात गुन्हा कलम 141, 143, 146, 149, 323, 504 मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आव्हाडांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातील पोलिसांनी लावलेली कलमे ही जमिनपात्र गुन्हे होते. त्यानंतर आणखी काही कलमांतंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार दडपशाही असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)