“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच एकनाथ शिंदे…”, मंगल प्रभात लोढांकडून शिंदेंची शिवरायांशी तुलना

सातारा | Mangal Prabhat Lodha – आज (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं वक्तव्य लोढा यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, लोढांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सडकून टीका केली आहे. “ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार, गद्दार म्हणून ओळखतं, त्यांच्यासोबत महाराजांची तुलना हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासारखं आहे. राज्यपाल जे बोलतात तेच मंत्री महोदय आज बोललेले आहेत. हा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. हा आवाज नक्की कोणाचा?”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)