‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर संभाजीराजे म्हणाले, “अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान…”

कोल्हापूर : (Sambhajiraje Chhatrapati On Ajit Pawar) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यावर महाराष्ट्रात वादंग निर्माण झालं आहे. या प्रकरणाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीमहाराज (Chhatrapati Sambhajiraje) यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजपा या विधानाचा निषेध करत आहे. अशातच आता छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

संभाजीराजे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं, स्पष्ट करा. ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान चुकीचं. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचं आहे.”

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर संबोधनावरून विधानसभेत बोलताना आक्षेप घेत त्यांना स्वराज्यरक्षक उपाधी योग्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभर संताप सुरु झाला आहे. आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करताना कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? अशी विचारणा केली आहे. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये, असेही राजे म्हणाले. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरातून भूमिका स्पष्ट केली.

Prakash Harale: