राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना श्रीरंग बारणे यांनी खुले आव्हान केलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये (Maval) मीच जिंकणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांनी व्यक्त केला.
श्रीरंग बारणे हे पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मिडिया संवाद साधताना सांगतिले. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावही टीका केली. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा मी 2 लाख 53 हजार मतांनी पराभव केला आहे. 2014 असेल 2019 असेल मी समोर कोण आहे हे बघितलं नाही. 2024 च्या निवडणुकीतही मी मावळ मतदारसंघातून विजयी होईल. समोर कोण आहे याची मला चिंता नाही. मी जनतेतून काम करुन मावळ मतदारसंघात वेगळा ठसा निर्माण केल्याचे श्रीरंग बारणे यांनी म्हणले.
विरोधी पक्ष एकत्र आले तरी त्यांचे विचार जुळत नाही ते एकमेकांना खेचत असतात त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे एनडीएचं सरकार येणार आहे. असे हि बारणे यांनी म्हंटले. जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात ते निर्णय जाहीर करतील.
उद्धव ठाकरे हे चांगला माणूस आहेत. पण संजय राऊतांनी त्यांचे राजकारण संपवल्याचे श्रीरंग बारणे म्हणाले. उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचं काम संजय राऊतांनी केले. राजकारणाला न शोभा देणारे वक्तव्य संजय राऊत करत असतात असे देखील श्रीरंग बारणे यांनी म्हणले.