कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत पंढरपूरच्या यात्रांवर मोठा परिणाम झाला. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत यात्रा व पांडुरंगाची रथयात्रा संपन्न झाली. आता यंदा मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. त्यामुळे या आषाढी यात्रेचा सोहळा आनंदात होणार आहे.
ओढू पांडुरंगा रथ। आम्ही वडार भाग्यवंत।।
पांडुरंगाचा रथ ओढण्याचा मान वडार समाजाला
आम्ही भाग्यवंत। पांडुरंगाचे वारकरी।।
ओढू पांडुरंगाचा रथ।। आम्ही वडार मानकरी।।
आषाढी, कार्तिकी या दोन प्रमुख यात्रा आणि या यात्रेसाठी येणारा भाविकांचा महापूर म्हणजे या पृथ्वीतलावरील एक अनुपम भक्ती सोहळा आहे. पांडुरंगाचे मुखी नाम घेत पांडुरंगाच्या वारीस निघालेला वारकरी घरातून पाऊल बाहेर पडताच मनाने पंढरीस पोहोचलेला असतो. पांडुरंगाची सगुण साकार मूर्ती सदैव आपल्या हृदयात व नेत्रात साठवून ठेवलेला भक्त वारीस येेतो व तो केवळ देहरूपी वारी पोहोचविण्यासाठी. मनाने तो नित्य पंढरीत येत असतो.
आषाढी, कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या वेळी पांडुरंगाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निघतो आणि पांडुरंगाच्या प्रदक्षिणा मार्गावर भक्तांची अलोट गर्दी होते. सावळ्या पांडुरंगाची प्रतीकात्मक मूर्ती रथात ठेवली जाते. श्रीमंत खाजगीवाले संस्थानच्या वतीने सुमारे ३५३ वर्षांपूर्वी ही रथयात्रा सुरू करण्यात आली. अतिशय सुबक आणि आकर्षक अशा लाकडी रथात विराजमान झालेले भगवंत आपल्या क्षेत्राची नगर प्रदक्षिणा करावयास निघतात आणि त्यांचा रथ ओढण्याचा मान असतो तो पंढरीतील वडार समाजाला.
साऱ्या विश्वाच्या अस्तित्वाचा वडार हा कष्टकरी समाज दिवसभर काबाडकष्ट करावयाचे आणि मुखी पांडुरंगाचे नाव घेत रात्रीचे दोन घास भोजन करावयाचे या समाजाची परंपरा होती.
पांडुरंगाचा महान रथ ओढण्याचा मान या कष्टकरी समाजाला मिळाला आहे. हे या समाजाच्या दृष्टीने परमभाग्याचे प्रतीक समजले जाते. महाराष्ट्रामध्ये तीन पवित्र पायरींचे दगड आहेत, यामध्ये पंढरपुरामध्ये दोन पायऱ्या आहेत. यात माझ्या श्री संत चोखामेळा यांची पायरी, २) श्री संत नामदेव महाराज यांची पायरी या दोन भक्तीच्या पायऱ्या, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेची, 3) हिरोजी इंदुलकर (वडार) यांची सेवेची तिसरी पायरी
स्वराज्याची राजधानी रायगड येथे आहे.
दगडाला देवपण देणारे आम्ही वडार।
करतो कष्ट अन् मुखी घेतो हरीचे नाम आम्ही वडार।।
छन्नीने मारतो दगडाला घाव तोच भाग्यवंत आम्ही वडार या उक्तीप्रमाणे आम्ही हरीचे नाम मुखामध्ये घेऊन दिवसभर कष्ट करीत असतो.
काये कष्ट वाचे हरिनामा।
आम्ही भाग्यवंत आम्हा हेची काम।
आम्ही वडार भाग्यवंत।।
या अभंगाप्रमाणे कष्टाचा प्रपंच अन् सेवेचा परमार्थ करणाऱ्या वडार समाजाला मिळाला रथ ओढण्याचा मान. आमच्या वडार समाजाचा प्रत्यक्ष परमेश्वराने केलेला सन्मान आहे, असे आम्ही समजतो.
_समस्त वडार समाज, पंढरपूर