राज्यभरात एनआयएची मोठी कारवाई! 13 ते 14 दहशतवाद्यांना घेतले ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. शनिवारी पहाटेपासून एनआयएने राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या कारवाया केल्या असून दहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात संयुक्तपणे कारवाई करत दहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने ही मोठी कारवाई करत महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होते. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती देखील पुढे येत आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही पथकाकडून जप्त करण्यात आले आहे.