ताज्या बातम्यादेश - विदेशराष्ट्रसंचार कनेक्ट

भारत-नेपाळ पुन्हा सीमावाद

रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळने घेतला आक्षेप

काठमांडू : नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमा विवादाचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. दोन्ही देशांच्या सीमेजवळ भारतात बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणावर नेपाळ सरकारने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. हा रस्ता सीतामढीच्या अनेक भागांना नेपाळ सीमेवरील भिथामोड आणि नेपाळमधील जनकपूरला थेट जोडतो. येथे पूल बांधण्यात येणार आहे.

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी सीमेच्या सुमारे १.१० किमीच्या रस्त्याच्या रुंदीकरणावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. हा रस्ता राजधानी पटनापासून १३५ किमी उत्तरेस सीतामढी जिल्ह्यातील सुरसंद ब्लॉकमध्ये सीमेजवळ बांधला जात आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी राज्याच्या गृहविभागाला पत्र पाठवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा रस्ता राज्य रस्ते बांधकाम विभाग बनवत असल्याची माहिती समोर येत आहे.

नेपाळचा या आक्षेपाकडे आश्चर्य’ म्हणून पाहिले जात आहे. कारण घटनास्थळी दोन्ही देशांदरम्यान स्पष्टपणे सीमांकित सीमा होती. नो-मॅन्स लँडच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशांकडून काम सुरू होते. भारताकडून आंतरराष्ट्रीय खांबांच्या दक्षिणेला आणि पलीकडे नो-मॅन्स लँडमध्ये दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम सुरू होते.

नेपाळशी जोडणारा रस्ता…

सर्वेक्षणाच्या नोंदीनुसार हे क्षेत्र प्रादेशिक कमांड अंतर्गत येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतातील रस्तेबांधणीचे काम ठप्प झाले आहे. नागरिकांना येथून प्रवास करणे खूप कठीण जाते. हा रस्ता सीतामढीच्या अनेक भागांना नेपाळ सीमेवरील भीथामोड आणि नेपाळमधील जनकपूरला थेट जोडतो. येथे पूल निर्माण केला जाणार आहे. पुलाचे बांधकाम सुरू होते, दरम्यान नेपाळ सरकारने त्यावर बंदी घातली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये