“बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य!

मुंबई – Sanjay Raut on CM | राज्याच्या सत्ताकारणातील काही गणिते बदलताना दिसत आहेत. एकनाश शिंदे यांचा गट या सत्ता नाट्यात नवीन पर्याय शोधत असल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच आता राजकीय वर्तुळात शिंदे यांचा गट मनसेसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा पक्षात जाऊ शकतात. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला त्याचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही. बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणर असेल तर ऐतिहासिक गोष्ट असेल, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या चौकशीसाठी फोन केल्याचं बोललं जात आहे. मात्र राज्यातील सध्याची स्थिती पाहता अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.