“…म्हणून संजय राऊतांना अटक”; शरद पवारांनी पहिल्यांदाच सांगितले कारण
मुंबई – Sanjay Raut ED : पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याचे आरोप असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावरी कारवाईवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या कारवाईवरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“संजय राऊत हे केंद्र सरकारविरोधात वर्तमानपत्रात लिहित होते, त्यामुळे मोदी सरकारने त्यांना ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून अटक केली आहे.” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. सध्या पत्राचाळ प्रकरणात राऊतांची चौकशी सुरु आहे मात्र, कोरोना काळात औषधांसाठी किती खर्च आला? असे प्रश्न विचारले जात आहेत” असा खुलासा शरद पवार यांनी यावेळी केला.
“कोठडीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय प्रश्न विचारतात तर, राऊत यांनी सांगितलं की कोरोना काळात मुंबईत औषधांसाठी किती खर्च झाला असे प्रश्न विचारले जातात आणि याचे उत्तर नाही दिले तर तुम्हाला सोडले जाणार नाही असंही सांगितलं जातं.” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.