मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक?

मुंबई : (CM Uddhav Thackeray On Cabinet Matting) बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे. मात्र, यापुर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटचा मास्टरस्ट्रोक टाकत बुधवार दि. २९ रोजी पार पडलेल्या कॅबिनेटमध्ये मोठे निर्णय घेतले आहेत. १. औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता. २. उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. ३. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत, ४.राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. ५. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. ६. कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार. ७. अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार हे देखील निर्णय घेण्यात आले आहेत
त्याचबरोबर ८. ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. ९. विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. १०. निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय. ११. शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय. अशा प्रकारचे निर्णय घेऊन ठाकरे सरकारनं हा शेवटचा मास्टरस्ट्रोक टाकला आहे.