“मराठी माणसात व्यवसाय करण्याचं धाडस नाही”, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

पुणे : (Chandrakant Patil speck On New Business) मराठी माणूस हा शिक्षण झाल्यास नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं तो धाडस करत नाही. मराठीचा टक्का व्यवसाय आणि राजकारणात कमी झाला आहे. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मराठी माणूस शिक्षण घेतल्यावर नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं धाडस करत नाही. अस स्पष्टपणे चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे.
राजकारणात येणाऱ्यांची संख्या देखील कमी होत आहे. निवडणुकांची तिकीट देऊ नका असं मराठी माणूस म्हणतो. विश्लेषकांमध्ये देखील अमराठी असणाऱ्या व्यक्तींची नाव आहेत. मात्र, मराठी नाव नाही. ही मानसिकता बदकायला हवी. यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. .