ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“राज्य सरकार मनोज जरांगेंना मारू इच्छितं, त्यांना हे सरकार…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Sanjay Raut – मागील सोळा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. त्यामुळे आता जरांगेंच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकार मनोज जरांगेंना मारू इच्छितं, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदे सरकार मराठा आरक्षणासाठी काहीही करू इच्छित नाही. त्यामुळे हे सरकार केवळ आश्वासन देत आहे. तसंच हे सरकार मनोज जरांगेंना मारू इच्छितं. त्यांना हे सरकार संपवू पाहतंय, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये मागील सोळा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. तर काल आंदोलनस्थळी संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे ( sambhaji bhide )आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन देखील देण्यात आलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये