‘पद्मश्री जाहीर होताच रवीना म्हणते, “माझ्या कामाची दखल घेतली, माझा…”

नवी दिल्ली : (Raveena Tondon On Padmashri Award) प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tondon) नुकताच ‘पद्मश्री पुरस्कार’ (Padmashri Award) जाहीर झाला आहे. त्यानंतर प्रथमच दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली, ” मला ‘पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे. गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून मी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता माझ्या फिल्मी करिअरची दखल घेत ‘पद्मश्री पुरस्कारा’साठी माझा विचार केल्याबद्दल मला खरच खूप आनंद होत आहे”.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रवीना टंडनला ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली ‘पत्थर के फूल’ (Patthar Ke Phool) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्याच सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरच्या सर्वोतकृष्ट महिला पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर रवीनाने मागे वळून पाहिलं नाही. ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
रवीना पर्यावरणावर बोलताना म्हणाली, “देशभरातील डोंगराळ भागातील जमीनीचा नाश होत चालला आहे. यावर शास्त्रज्ञदेखील वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. आता पर्यावरणाचा विचार करुन विकासाचं नियोजन करण्याची गरज आहे. पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे प्रश्न वाढवता कामा नये”.
या आधी रवीनाला परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक लोकप्रिय सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. रवीना 1990 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. ‘पद्मश्री पुरस्कारा’आधी तिला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 2001 साली तिला ‘दमन’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.