ताज्या बातम्या

“…तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मिटकीरींची टीका

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुंबई भेटीत त्यांनी पंतप्रधांनांना आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून आज दिली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की, याआधीच राज्यपालांनी पदमूक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे.”

पुढे ते म्हणाले, “ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये