ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा…”, जयंत पाटलांच्या निलंबनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

नागपूर | Ajit Pawar – (Suspension action against Jayant Patil) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर (Nagpur) येथे सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं. नागपूर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसंच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमतानं मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो यांच्याकडून अजानतेपणाने असे शब्द जाऊ नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. हे घडायला नको होतं. चर्चा करताना अजानतेपणानं असा शब्द जातो, नंतर सर्वांच्या लक्षात येतं हे बरोबर नाही.”

“विधानसभेत सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्षाला देखील आपले विचार मांडण्याची संधी मिळाली की मार्ग निघतो. आम्ही एवढचं म्हणत होतो की भास्कर जाधवांना बोलून द्यावं. पण, जे काही घडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे, जेव्हा एखादं चुकतं तेव्हा पुढं गेलं तर त्याच्यातून चांगलं वातावरण तयार व्हावं”, असंही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये