“महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Mahaparinirvan Din 2022 – आज (6 डिसेंबर) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले होते. यावेळी संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज देशातील प्रत्येक क्षेत्रात घटनेची पायमल्ली सुरू आहे. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. त्यामुळे आज आम्हाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षानं आठवण होत आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे आपल्या महाराष्ट्राची दैवतं आहेत. ते आमच्या मनात आहेत. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो महासागर उसळला आहे, त्यातील आम्ही एक आहोत. फक्त आजच आम्हाला त्यांचं स्मरण होत आहे असं नाही. जेव्हा जेव्हा या देशात कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात तेव्हा तेव्हा आम्हाला बाबासाहेबांची घटना आणि कार्य सतत आठवत असतं. आज आम्हाला आंबेडकरांची प्रकर्षानं आठवण होत आहे. कारण देशातील प्रत्येक क्षेत्रात घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आम्हाला आज आंबेडकर आठवत आहेत”.
“महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे, कारण आंबेडकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरेंचा हात धरुन आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरुच ते या आंदोलनात सहभागी झाले होते. म्हणून आज आम्हाला त्यांचं स्मरण होत आहे,” असंही राऊत म्हणाले.
2 Comments