ताज्या बातम्यारणधुमाळी

माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

मुंबई | CM Eknath Shinde In Navi Mumbai Mathadi Melava – नवी मुंबईत माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. आता माझ्यासोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. त्यामुळे काही कमी पडणार नाही माथाडी कामगारांच्या घरांना प्रोत्साहन देणार असून सिडको घरांसाठी मदत करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच माथाडी कामगारांना काहीच कमी नाही. आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत. रोजगार, कारखाने याबद्दल आम्ही धोरणात्मक निर्णय घेतोय हे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. दोन-अडीच महिन्याचे सरकार आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्षांचे सरकार यामध्ये फरक आहे, असंही शिंदे म्हणाले.

यावेळी अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी ते म्हणाले की, आम्ही मराठा समाजाला न्याय देवू. सारथीला मदत करू. सरकार तुमच्या पाठिशी आहे. दीड हजार लोकांच्या सरकारी नोकऱ्यांचा निर्णय घेतला. गेली अडीच वर्ष फाईल हालत नव्हती. आमचं सरकार देणारं घेणारं नाही.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गासारखा ऐतिहासिक मार्ग गेम चेंजर प्रकल्प आहे. मेट्रोची कामं फास्ट गतीनं होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आमचा कोणताही पर्सनल अजेंडा नाही. सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. माथाडी कामगार संघटनांचे प्रश्न आम्ही सोडवणार. कामगार चळवळीत चुकीच्या प्रवृत्तीचा चोख बंदोबस्त केला जाईल. नवी मुंबईतील भूमिपुत्रांच्या गरजेपोटी घरांना संरक्षण आम्ही दिलं आहे. कायदे बदलण्याची गरज आली तर तेही बदलू. पण सर्वसामान्यांना न्याय देवू. सरकार जबाबदारी पासून कधीच पळ काढणार नाही. आम्ही सामोरे जाणारे आहोत. वरळीमधील 10 हजार लोकं बाधीत होणार होते. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन निर्णय घेतला, त्यांना भाडे देण्याचा निर्णय घेतला. हे चालता बोलता काम करणारे सरकार आहे, असंही ते म्हणाले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये