ताज्या बातम्यारणधुमाळी

“पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | Devendra Fadnavis On Uddhav Thackeray – ठाकरे सरकारच्या काळात मुंबई मेट्रो 3 प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ही मेट्रो कारशेड आरेमध्ये करावी की कांजूरमार्गमध्ये यावरून मोठा वाद झाल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेड आरेमधून हलवून कांजूरमार्गला नेली. तिथेही स्थगिती आल्यामुळे हे काम थांबलं होतं. अखेर शिंदे सरकारच्या काळात त्यासंदर्भातल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. आज (30 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध झाला असं, म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

मेट्रोचा वाद निर्माण झाल्यामुळे मेट्रो सुरू होण्यास विलंब होणार आहे. पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विलंब करण्यात आला त्यामुळे मेट्रोचं काम पूर्ण होण्यास उशीर होईल. मात्र, नव्या सरकारने मुंबईकरांच्या हितासाठी चांगला निर्णय घेतला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो महत्त्वाची आहे, पर्यावरणला सपोर्ट करणारी ही मुंबई मेट्रो 3 आहे, विरोधकांनी यामध्ये केवळ राजकारण केलं. जरी काजूरमार्गला कारशेडला नेला असता तरी स्टेबलिंग लाइन, रॅम्प तयार करावा लागला असता त्यामुळे आरेची जागा मोकळी राहिली असती असं नाही त्यामुळे आरेचा निर्णय हिताचाच आहे, असंही फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आधीच्या सरकारने समिती नेमली होती, त्याचा अहवाल येईपर्यंत काॅस्ट सुद्धा वाढली आहे. मात्र आता मुंबई मेट्रो धावण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत मेट्रोचा एक टप्पा सुरु होईल. त्यानंतर लगेच मेट्रो पूर्ण क्षमतेनं सुरु होईल. 20 हजार कोंटींचा हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. अश्विनी भिडे आणि टीमनं यासाठी अहोरात्र मेहनत केली आहे, त्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये