ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“महत्वाची खाती फडणवीसांकडेच, मग मुख्यमंत्रीपदाला अर्थ काय”; मिटकरी

मुंबई : (Devendra Fadnavis On Eknath Shinde) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज अखेर सहा दिवसांनी पार पडले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार शपथ घेतलेल्या 18 मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व अन्य मंत्र्यांना न दिलेल्या खात्यांची जबाबदारी आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण या सारखे महत्त्वाचे खाते त्यांनी स्वःताकडे ठेवले आहेत.

भाजपच्या नेत्यांकडे देण्यात आलेल्या आणि शिंदे गटाला देण्यात आलेल्या खात्यांची माहिती.. 1. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2. सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3. चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4. डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास 5. गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण  6. सुरेश खाडे- कामगार 7. रवींद्र  चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण 8. अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 9. मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

1. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता  2. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म  3. 3. संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन 4. संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन 5. उदय सामंत- उद्योग 6. प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण 7. अब्दुल सत्तार- कृषी 8. दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा 9. शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

या सर्व खात्यांवर नजर फिरवली तर शिंदे गटापेक्षा भाजपच्या मंत्र्यांवर महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मग महत्त्वाची खाते भाजपकडे असल्याने मुख्यमंत्री पदाला अर्थ काय राहिला असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये