ताज्या बातम्यारणधुमाळी

“आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच…”, जयंत पाटलांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

सांगली | Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रीपद मिळालं नाही तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसंच उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार करू असं म्हटलं तर ती घोषणा खरी मानली जाते, असंही पाटील म्हणाले. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही खोचक टोला लगावला आहे. मंत्रीपद मिळालं नाही, तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. विस्तार केला आणि नाराज आमदार बाहेर पडले तर संख्याबळ कमी होईल आणि शिंदे गट अडचणीत येऊ शकतो, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार थांबला. मंत्रीमंडळ विस्तार होणार हे जाहीर करायचा अधिकार फडणवीसांना नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आहे. मात्र, फडणवीसांनी आपलं मत मांडलं असावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. अशा स्थितीत बरोजगार असणाऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. आम्ही जी पोलीस भरती केली तीच भरती हे सरकार जाहीर करत आहे. नवीन काही सरकारकडून काम होत नाही. जे सरकारमध्ये आहेत, त्यांची उद्योग टिकवण्याची जबाबदारी आहे. पण या सत्तेतील लोकांकडून निराशा होत आहे. मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीत लोक निवडून देतील का? याची शाश्वती शिंदे आणि भाजपला वाटत नाही. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये