दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल म्हणाले…
![दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल म्हणाले… rahul gandhi image only](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/rahul-gandhi-image-only.jpg)
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढी आणि वाढती महागाई यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षच काम करतो, असे ते म्हणाले आहेत. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८२७ रुपये होती, आणि अनुदान ४१० रुपये मिळत होते, तर २०२२ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे.
स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळं सहा आठवडयांत झालेली ही दुसरी वाढ आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नघटकांपासून ते सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडणार आहे.