ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…त्यामुळे तुम्ही तोंडावर पडाल”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut On Shinde Government – दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून (Disha Salian Case) राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. तसंच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. यादरम्यान, आज (24 डिसेंबर) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “गरिबांना रेशन देण्यासंदर्भात केंद्र सरकारनं नवीन रेशनची पाॅलिसी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनं एसआयटीचं रेशन केलं आहे. मागेल त्याला एसआयटी. ज्या पद्धतीनं 50 खोके देऊन महाराष्ट्रातले 40 आमदार फोडण्यात आले, तो नक्की काय व्यवहार होता, त्यावरही एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. मात्र, जे विषय पोलीस, सीबीआयनं संपवले आहेत त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. पण तरीही आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. त्यामुळे तुम्ही तोंडावर पडाल.”

“सत्ताधारी पक्षातील अनेकांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आता त्यांचाही तपास होईल. आम्ही दोन दिवस नागपुरला जाणार आहोत. तेव्हा आम्ही अनेक विषय समोर आणू. त्यावरही एसआयटीची मागणी करू. एसआयची स्थापन करायची या सरकारला फार खाज आहे. खाजवत बसा मग. अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये एसआयटी ही स्थापन केली जाते. पण या सरकारनं एसआयटी आणि पोलिसांचं महत्त्वच कमी करून टाकलं आहे. उठसूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. कुणीही विधानसभेत उठतो आणि एसआयटीची मागणी करतो”, अशी टीकाही राऊतांनी केली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये