“…म्हणून आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार”; लॅारेन्स बिष्णोईच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य
!["...म्हणून आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार"; लॅारेन्स बिष्णोईच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य janata vasahat 3](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/janata-vasahat-3-780x470.jpg)
मुंबई | Salman Khan – बॅालिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी पत्राच्या माध्यमातून धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू’ असं या पत्राच्या माध्यमातून थेट अभिनेता सलामान खानच्या घरी त्याच्या वडिलांपर्यंत पोहचवणाऱ्या बिष्णोईने टोळीने आता सलमानला माफ करण्यासंदर्भातील तयारी दर्शवली आहे. सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणामध्ये माफी मागितल्यास आम्ही त्याला माफ करु असं बिष्णोई टोळीचा मोऱ्हक्या असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईच्या भावाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आलं होतं. या पत्रात सलमान खानला धमकी देण्यात आली होती. सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू असं या पत्रात लिहीण्यात आलं होतं. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी एका अज्ञाक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ही धमकी देण्यामागे बिष्णोई टोळीच असल्याचा खुलासा झालाय. बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं असल्याचं पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकालच्या चौकशीमधून समोर आलं आहे.
लॅारेन्स बिष्णोईचा मानलेला भाऊ असणाऱ्या राजवीर सोपू याने सलमान हा आमचा पुढचं लक्ष असल्याचं उघडपणे सांगितलं आहे. मात्र, सलमानने काळवीट प्रकरणासंदर्भात माफी मागितल्यास आम्ही त्याला माफ करु, असंही सोपूने म्हटलंय. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सोपूने एका मुलाखतीमध्ये आता आमचं पुढील लक्ष्य सलमान खान असल्याचं सांगितलं आहे. “सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन फार मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाही,” असं सोपूने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याचं वृत्त ‘अमर उजाला’ने दिलं आहे.
सोपूचं हे उत्तर ऐकून मुलाखतकाराने, ‘तुम्ही माझ्या मुलासारखे आहात म्हणून सांगतोय स्वत:ही जगा आणि इतरांनाही जगू द्या,’ असं म्हटलं. त्यावर सोपू म्हणाला, “तुम्हाला शब्द देतो, सलमानचा कार्यक्रम करु द्या, त्यानंतर आम्ही कोणालाही काहीही करणार नाही.” सलमानने कधीच या प्रकरणात आपली चूक कबूल केली नाही केवळ मुलाखती दिल्या असा आक्षेपही सोपूने घेतलाय. त्याने केवळ स्वत:ची चूक मान्य केली तरी आम्ही त्याला माफ करु असंही सोपूने मुलाखतीत म्हटलं आहे.