ताज्या बातम्यारणधुमाळी

“अजित पवार जर परत आलेच नसते तर…”, भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई | Bhaskar Jadhav On BJP – मागील आठवड्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर एसीबीनं (ACB) केलेल्या कारवाईनंतर आज कणकवलीतील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. वैभव नाईक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय हेतूने झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून त्यांच्या समर्थनार्थ आज कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

“पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या मागे संजय राठोड असल्याचं भाजपकडून (BJP) सातत्यानं रान उठवलं गेलं. चित्रा वाघ तेव्हा रोज सकाळी टिव्हीसमोर यायच्या. उद्धव ठाकरे साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं मानतो. तुमच्याकडून तरी न्यायची अपेक्षा आहे. या मुलीला न्याय द्या, असं म्हणायच्या. आज चित्रा वाघ (Chitra Wagh) कुठे आहेत? आज पूजा चव्हाणच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. कारण चित्रा वाघ यांच्या पक्षाच्या सरकारमध्येच संजय राठोड (Sanjay Rathod) यांना सन्मानानं मंत्रिमंडळात घेतलं गेलं आहे”, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

पुढे भास्कर जाधव म्हणाले, “अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेल्या 20 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर आरोप लावला की ते दाऊदनं केलेल्या बाॅम्बस्फोटात सहभागी होते. त्यानंतर नवाब मलिक अनेकवेळा निवडून आले. मंत्री झाले. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. पण तेव्हा ते त्यांना बाॅम्बस्फोटातले आरोपी म्हणून वाटले नाहीत.”

“आज हे सांगतात की तुम्ही बाॅम्बस्फोटातल्या आरोपींच्या मांडीला मांडी लावून बसले होते. ते 40 गद्दारही असं सांगतायत. पण 2019 साली भाजपनं राष्ट्रवादीसोबत शपथ घेतली. कदाचित अजित पवार (Ajit Pawar) जर परत आलेच नसते, शरद पवारांनी (Sharad Pawar) कानाडोळा केला असता, तर हे त्याच नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून त्या मंत्रीमंडळात बसले असते. त्यावेळी त्यांना नवाब मलिक भ्रष्टाचारी दिसले नसते. बाॅम्बस्फोटातील आरोपी दिसले नसते. अनिल देशमुख भ्रष्टाचारी दिसले नसते”, असंही भास्कर जाधव म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये