जे ‘अढळ’ ते…; आढळराव पाटलांचे नाव न घेता ठाकरेंची टीका!
![जे 'अढळ' ते...; आढळराव पाटलांचे नाव न घेता ठाकरेंची टीका! Uddhav Thackeray And Adhalrao Patil](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/Uddhav-Thackeray-And-Adhalrao-Patil-780x470.jpg)
मुंबई : (Uddhav Thackeray On Adhalrao Patil) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री निवस्थानाबाहेर पुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेची माजी खासदार आढळराव पाटलांवर सडकून टीका केली आहे.
ठाकरे म्हणाले की, “माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत. असं म्हणत ठाकरेंनी आढळराव पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे. ठाकरेंच्या या टीकेनंतर आता आढळराव पाटील नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दसऱ्याला काहीच दिवस शिल्लक असून, येताना शिस्तीने या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. विरोधक शिवसैनिकांकडून काहीतरी चुकीचं करून घेण्याचे प्रयत्न करतील पण तुम्ही सावध राहा असा सल्ला देखील ठाकरेंनी यावेळी दिला. आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.