ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

शिवसेना-शिंदे याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णांकडून महत्त्वाचा निर्णय! ठाकरेंना मोठा दिलासा…

नवी दिल्ली : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील तब्बल 40 आमदार फोडून पक्षाच्याविरोधात बंड पुकारलं. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येवून कोसळलं. या पार्श्वभुमीवर शिंदे-शिवसेना वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे राहणार, यासोबत राज्यातील सरकारच्या अवैधेसोबत, विधानसभा अध्यक्षांची निवड, 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अशा एकूण सहा याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी चालू आहे.

दरम्यान, या प्रकरणी ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण ऐनवेळी ही सुनावणी लांबणीवर पडून १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी तब्बल १० दिवसांनी लांबवणीवर पडली आहे. पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षादरम्यान आलेली ही सर्वात मोठी बातमी समजली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणीचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही याचिका सरन्यायाधीश रमण्णा यांच्याच खंडपीठासमोर होणार आहे. या याचिकांच्या सुनावणीबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रमणा यांचे निरक्षणे हे ठाकरे गटासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि त्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तकिोे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये