ताज्या बातम्यादेश - विदेश

फसवणूकीची चिंताच मिटली! Fraud Number पासून वाचण्यासाठी सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | आपल्या मोबाईलवर अनेकदा अनोळखी नंबरवरून फोन येत असतात. त्यात मग काही नंबर फसवणूकीचे असतात तर काही आपल्याच ओळखीतले असतात. मात्र हा अनोळखी नंबर नक्की कोणाचा आहे हे आपल्याला फोन उचलल्याशिवाय समजत नाही. हीच चिंता आता मिटली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (TRAI) आता लवकरच एक महत्त्वाची सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेद्वारे तुमची अनोळखी मोबाईल नंबरपासून सुटका होणार आहे.

केंद्र सरकारकडून एक सुविधा अंमलात आणली जाणार आहे. या सुविधेतून तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. आता जो व्यक्ती तुम्हाला काॅल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव्ह केलेलं नसलं तरी देखील ते तुम्हाला दिसणार आहे.

या योजनेअंतर्गत आता एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचं असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी फाॅर्मवर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. सोबतच त्या फाॅर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचं जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीनं इतरांना काॅल केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या सुविधेमुळे अनेक जणांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये