ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाले, “अजित पवारांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन…”

जालना | Manoj Jarange Patil – मागील 14 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Protest) उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं ठोस आश्वासन दिलं नसल्यामुळे त्यांनी त्यांचं उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जरांगेंनी कालपासून पाणी आणि औषध घेणं बंद केलं आहे. त्यांनी सलाईन देखील काढून टाकली आहे.

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. मात्र, अद्यापही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे मनोज जरांगे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. यादरम्यान, माध्यमांशी बोलताना जरांगेनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आवाहन केलं आहे.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, जे आमच्याविरोधात बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणकाच असा आहे. त्यामुळे जो बोलत नाही त्याला विनाकारण लक्ष्य करायचं मग तो कोणी का असेना. तसंच जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा असा आमचा त्यांना संदेश आहे.

कमी पडलो असं अजित पवार म्हणाले होते. तर आता आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन आरक्षणाचा विषय लावून धरावा. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, गोरगरिबांचं कल्याण करावं. आम्हा गोरगरिबांचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेलच, असं आवाहन मनोज जरांगेनी अजित पवारांना केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये