एकनाथ शिंदेंच्या बंडावर किरण मानेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ईडीचा बडगा…
गेल्या काही महिन्यांपूर्वी टीव्ही सिरीयल अभिनेते किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. तसंच ते विविध विषयावर पोस्ट देखील करत असतात. नुकतच त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकारणावर एक पोस्ट शेयर केली आहे.
किरण माने आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, ‘ईडीचा बडगा.. हे सगळ्यात मोठ्ठ कारण आहे. अशा कुरबुरी फक्त शिवसेनेतच नाही, तर सर्व पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. राष्ट्रवादी, आप, काँग्रेसमध्येही अशाच कुरबुरी सुरु आहेत. ज्यांनी- ज्यांनी भाजपला साथ दिली त्या सर्वच नेत्यांना ईडीची भीती आहे. मजबूरी को समझना चाहीए असं देखील किरण माने त्या पोस्ट म्हणाले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणारे जे जोशी आहेत त्यांना देखील ईडीच नोटीस आलं होत त्या घटनेकडे सर्वानी दुर्लक्ष देल आहे असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलं आहे.
दरम्यान, काल उद्धव ठाकरे याचं जे फेसबुक लाइव्ह झालं यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी केलेल्या पोस्ट नंतर किरण माने यांनी त्या पोस्टला कमेंट करत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच त्यांनी ईडी मुळे सर्व आमदार एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये गेले असल्याचं म्हणतं सर्व ईडी च्या मुळाशी भाजप असल्याचं म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्या पोस्टवर देखील कमेंट केल्या जात आहेत.