ताज्या बातम्यारणधुमाळी

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तुलना करण्याचा मूर्खपणा…”

मुंबई | Mangal Prabhat Lodha – आज (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून विरोधी पक्षातील नेत्यांनी लोढांवर टीका सडकून टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर मंगल प्रभात लोढांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, “विरोधक काय बोलतील त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झालं नाही ते टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलं असेल का? त्यांनी नाही बघितलं. मी फक्त उदाहरण दिलं होतं. मी कधीही तुलना केली नाही किंवा करू शकत नाही. कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.”

“मी कधी वैयक्तिक टिपण्णी करत नाही. मी कधी राजकारणात जात नाही, मी असं समजतो की सरकारचं काम सकारात्मकतेनं करायचं आहे. महाराष्ट्रात फार काही समस्या आहेत. जे काही माझ्याकडे दोन-तीन विभाग आहेत, त्यामध्ये मी काय करू शकतो, त्याच्या मी प्रयत्नात असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झालं ते आता बंद केलं पाहिजे”, असंही लोढा म्हणाले.

नेमकं काय म्हणाले मंगल प्रभात लोढा?

“शिवराय आग्र्यातून बाहेर पडले तसंच शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. औरंगजेबानं शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी”, असं वक्तव्य लोढा यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये