“टिळकांनी याच साठी केला होता अट्टहास…”, वैभव मांगलेंची पोस्ट चर्चेत!
मुंबई | Vaibhav Mangale’s Post In Discussion – अभिनेते वैभव मांगले हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असतात. तसंच ते सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. वैभव मांगले नेहमी समाजातील वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. आता देखील ते त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.
वैभव मांगले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. “टिळकांनी याच साठी केला होता अट्टहास…!”, असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. तसंच या पोस्टच्या खाली कमेंट बाॅक्समध्ये वैभव मांगले यांनी “राजकारण्यांच्या हातात आपल्या धार्मिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक नाड्या गेल्या आहेत हे आता तरी लोकांच्या लक्षात येईल का ??? आणि या आपणच दिल्या आहेत.” अशी कमेंट देखील केली आहे. त्यामुळे वैभव यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्स देखील केल्या आहेत.
दरम्यान, वैभव मांगले सध्या झी मराठी वाहिनीवरील एका डान्स शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. तसंच त्यांचा ‘टाइमपास 3’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. याशिवाय वैभव मांगले अलबत्या गलबत्या नाटकामध्येही काम करत आहेत.